वर्धा: इतिहासातील पाने चाळताना काही बाबी आजही प्रासंगिक वाटतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाते एका घटनेने जुळले होते. १९३५ मध्ये महाराजांनी वयाच्या २६ व्या वर्षी अभूतपूर्व असा सालबर्डी यज्ञ केला होता. त्याबाबत काहींनी तक्रार केली. एक युवक विदर्भात बुवाबाजी करीत असल्याची तक्रार झाल्यावर त्यातील तथ्य तपासावे म्हणून गांधीजींनी स्वतः पत्र पाठवून महाराजांना बोलावून घेतले.

महाराज एक महिन्याच्या वास्तव्यासाठी १३ जुलै १९३६ रोजी सेवाग्राम आश्रमात पोहचले. १४ ऑगस्ट पर्यंत त्यांचा मुक्काम होता. इथूनच पुढे राष्ट्रसंतांनी आपल्या खंजेरीच्या निनादात स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग सुरू केला. या घटनेस आता ८७ वर्ष पूर्ण होत आहे. या भेटीचा इतिहास जागवितानाच त्यातून पुढे नवी पिढी कशी घडली, याची माहिती देण्यासाठी महापुरुषांचा जागर हे अभियान सुरू होत आहे.

Rahul Gandhi clarify his stance on reservation
नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात… बावनकुळेंचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: राष्ट्रपतींचे भाष्य लक्षणीयच, पण…

हेही वाचा… आंतरराज्यीय तस्करांचे तार गोंडपिपरीत; छत्तीसगडच्या वनपथकाकडुन गोंडपिपरीतून एकाला अटक

विविध गावात प्रचारक मंडळी शाळेत भेट देतील. विचार दर्शन घडवितील, अशी माहिती सुरेंद्र बेलुरकर यांनी दिली आहे. सेवाग्राम येथील रामकृष्णदादा बेलूरकर फिरते वाचनालय हे अभियान तुळजापूर ते सेवाग्राम दरम्यान राबवतील. यात ग्रामगीताचार्य शंकरराव मोहोड, विजय मंथनवार, सचिन सावरकर,बबनराव गोलाईत,प्रकाश अलवडकर,प्रवीण देशमुख,राजेंद्र जिकार,चेतन परळीकर,मेहबूब भाई, प्रफुल्ल अंबुळकर, विजय कोल्हे व अन्य सहभागी होणार.