बुलढाणा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानवावर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची पहिली घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड शिवारात घडली आहे. यात सुरेश गजानन देठे (वय ३५) व एकनाथ दिनकर लोड (३२ वर्ष) हे दोघे जखमी झाले. गावकऱ्यांनी बिबट्याचा प्रतिकार करण्याचे धाडस दाखविले. मात्र, दोघांना रक्तबंबाळ करून बिबट पसार झाला. दोघांना तात्काळ खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
479 leprosy patients found in Raigad district
रायगड जिल्ह्यात ४७९ कुष्ठरोगी आढळले, आदिवासी बहुल तालुक्‍यात कुष्‍ठरूग्‍ण संख्‍या गंभीर
Rwanda backed rebels enter in Congo city
आफ्रिकेत पुन्हा संहाराची चाहूल
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
dead leopard found in wheat field in Nimbhore Phaltan causing excitement
फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना

हेही वाचा – जागतिक महिला दिनी क्रिकेटपटू उमेश यादवला कन्यारत्न

हेही वाचा – पंतप्रधान मोदी, अदानी विरोधात घोषणा देत काँग्रेसचे नागपुरात आंदोलन

दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील हिंगणा इसापूर येथे घडली आहे. तिथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे शेगाव व नांदुरा तालुक्यातील शेतकरी व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Story img Loader