बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील दुर्गम अशा गोमाल गावात अतिसारामुळे (डायरिया) तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये एका युवतीसह दोन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनेक बाधित रुग्ण हे जळगाव जामोद व मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जिल्हा आरोग्य विभागाची पथके आणि अधिकारी गावात दाखल झाले आहे. गावात व्यापक सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहे.

आरोग्य यंत्रणांनी अद्याप अतिसारामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिघांचे मृत्यू कशामुळे झाले, हे स्पष्ट होईल, असे जिल्हा आरोग्य यंत्रणांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत्यूनंतर या तिघांचे मृतदेह झोळीत टाकून घरी न्यावे लागले. यामुळे गावकऱ्यांचा कुणीच वाली नाही, अशी बिकट स्थिती आहे.

Nagpur s controversial decoration Gulab Puri Ganesha finally stapna on Sunday evening
नागपूर : … अखेर गुलाबपुरीच्या गणपतीची प्रतिष्ठापना, वादग्रस्त देखाव्याची चर्चा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Pune man jumps into river after quarrel with wife
Pavana River: पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी; बचावकार्यात अग्निशमन दलाला आले अपयश, पण ८ तासानंतर…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
maharashtra bjp chief bawankule s son audi hits several vehicles in nagpur driver arrested
बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक

हे ही वाचा…गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…

गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील या तांडावजा गावात आरोग्य, रस्ते, दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही. रस्ते नसल्याने अतिसारामुळे अत्यावस्थ रुग्णांना रुग्णालयात न्यायला विलंब झाल्याचे समजते. यामुळे सागरीबाई हिरू बामण्या (१८), जिया अनिल मुजालदा (२ वर्षे) आणि रविना कालू मुजालादा (५) यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे मृतदेह झोळीत टाकून तब्बल १५ किलोमीटर पायपीट करीत गावात न्यावे लागले. स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ते नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

आरोग्य पथक गावात

या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी मृत्यूचे नेमके कारण सांगण्यास असमर्थता दर्शविली. आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनीही असमर्थता दर्शविली. आज संध्याकाळपर्यंत शवविच्छेदन अहवाल हाती येण्याची शक्यता डॉ. तांगडे यांनी बोलून दाखविली. यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. गावात आरोग्य विभागाची पथके दाखल झाली आहेत. आज अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीदेखील गोमाल गावात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. गावात व्यापक सर्वेक्षण करण्यात येत असून उपाययोजना करण्यात येत आहे. गोमाल परिसरात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने पथकाशी संपर्क साधण्यात मोठी अडचण येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण झाल्यावरही बुलढाणा आरोग्य विभागाला याबाबत माहिती नसल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा…गोंदियाः पूर्व विदर्भात भाजप ला मोठा धक्का, माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

आणखी ३० रुग्ण आढळले

आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गोमाल गावात अतिसाराची लागण झालेले आणखी ३० रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील १५ रुग्णांना उपचारासाठी जळगाव व अन्यत्र पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ रुग्णांवर गोमाल गावातच उपचार सुरू आहे. त्यासाठी गावातच कॅम्प तयार करण्यात आला असून वैद्यकीय पथकांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी याला दुजोरा दिला. यामुळे गोमाल गावातील स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.