चंद्रपूर: गुरे चराईसाइी जंगल परिसरात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड ( खुर्द ) उपवन परिक्षेत्रातील उपरी वनबिटातील डोनाळा जंगल परिसरात घडली. आनंदराव वासेकर (५०) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

आनंदराव वासेकर, चिंदूजी नैताम व किशोर सोनटक्के हे तिघे जण आपली गुरे घेऊन जंगलात गेले होते. गुरे चरत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक आनंदराव वासेकर यांच्यावर हल्ला करून त्याला जंगलात ओढत नेले. सोबतीला असलेल्या दोन व्यक्तींनी ही घटना पाहून आरडाओरडा करीत गावाकडे धाव घेतली आणि गावात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. ही माहिती वनविभागाला व सावली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने शोधमोहीम राबविली असता, मृत आनंदराव वासेकर याचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आला.

What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
forecast of the Meteorological Department there is a possibility of heavy rain in some parts of Maharashtra Nagpur
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खाते…
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
Amravati news Article on Farmers Crop Insurance
शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
tehsil office, Sindi railway,
वर्धा : भर रस्त्यात तहसील कार्यालय, तिथेच नायब तहसीलदाराची नियुक्ती…
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

हेही वाचा – शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…

हेही वाचा – ५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी सूर्यवंशी, बीट वनरक्षक सोनेकर, वनरक्षक महादेव मुंडे, आखाडे , मेश्राम व वन कर्मचारी उपस्थित होते. या घटनेमुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.