लोकसत्ता टीम

नागपूर: भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘प्रोजेक्ट टायगर’ ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबाबत भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. नवीन आकडेवारीनुसार, देशातील वाघांची संख्या २,९६७ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. २००६ मध्ये वाघांची संख्या १,४११, २०१० मध्ये १,७०६, २०१४ मध्ये २,२२६, व २०१८ मध्ये २,९६७ इतकी होती. पंतप्रधान मोदीं यांनी अमृतकाळा दरम्यान वाघांच्या संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन देखील प्रकाशित केला. तसेच ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स’ची देखील सुरुवात केली. ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नाण्याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar says he is considering raising the age of juvenile offenders to 14 years Pune print news
अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे विचाराधीन; अजित पवार यांची माहिती
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात, १५०० की २१०० आले? महिलांनो ‘असा’ चेक करा बँक बॅलन्स!
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
ST Corporation increased travel fare from January 24 midnight price of free money has increased
राज्यात घाऊक भाडेवाढ, एसटीचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ
hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर
Police arrested 118 Bangladeshi nationals in different 20 police stations in Navi Mumbai in last month
नवी मुंबईतून महिनाभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना अटक

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले व्याघ्र प्रकल्पाचे यश हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे. वन्यजीवांच्या भरभराटीसाठी, परिसंस्थेची भरभराट होणे महत्त्वाचे आहे. हे भारतात होत आहे. भारताने वाघांचे केवळ संरक्षणच केले नाही तर त्यांना भरभराटीसाठी एक परिसंस्थाही दिली आहे. भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच वन्यजीव संवर्धनात अनेक अद्वितीय यश मिळवले आहे. जगाच्या केवळ २.४ टक्के भूभागासह, जागतिक विविधतेमध्ये भारताचा वाटा सुमारे आठ टक्के आहे.

Story img Loader