वाशिम : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई, शिर्डी, नाशिक व इतर शहरांमधील अंतर कमी झाले. हळू हळू या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. मात्र वाढत्या अपघातांमुळे रस्त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ३० नोव्हेंबरपर्यंत या मार्गावर विविध गंभीर प्रकारचे ७३ अपघात होऊन या अपघातात १४२ जणांना आपले प्राण गमावले लागले. तर ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ४८९ अपघात झाले. या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली आहेत. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपये टोल महसूल वसूल झाल्याची माहिती सुरोसे यांनी दिली.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
traffic issues western express highway news in marathi
पश्चिम दृतगती मार्गाचे काँक्रिटिकरण अशक्य; वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे केवळ पुनःपृष्टीकरण करणार

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो सतर्क रहा; ‘या’ एक्सप्रेसच्या मार्गात बदल

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये उष्ण लहरी कमी मात्र पावसाळा, अति पाऊस वाढणार, संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल

समृद्धी महामार्गावर विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लेन शिस्त न पाळणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, वाहन अवैध ठिकाणी पार्किंग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन सुरक्षित न ठेवणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे आणि वाहन चालक सतर्क नसणे ही प्रमुख कारणे समृद्धी महामार्गावरील अपघातास कारणीभूत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader