वाशिम : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई, शिर्डी, नाशिक व इतर शहरांमधील अंतर कमी झाले. हळू हळू या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. मात्र वाढत्या अपघातांमुळे रस्त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ३० नोव्हेंबरपर्यंत या मार्गावर विविध गंभीर प्रकारचे ७३ अपघात होऊन या अपघातात १४२ जणांना आपले प्राण गमावले लागले. तर ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ४८९ अपघात झाले. या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली आहेत. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपये टोल महसूल वसूल झाल्याची माहिती सुरोसे यांनी दिली.

Western Railway, block on Western Railway,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लाॅक
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Two youths died in an accident on the Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
Mumbai, local train, Central Railway, Harbor Line, overhead wire, Mankhurd, Overhead Wire Breaks Between Mankhurd and Vashi, Vashi,
ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गाची वाहतूक विस्कळीत, जवळपास दोन तास प्रवाशांचा खोळंबा
block Western Railway, Goregaon-Kandivali route,
पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू
Traffic movement after debris clear on vani ghat
वणी घाटातील दरड हटवून मार्ग मोकळा
Question mark on stealth traffic after accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातानंतर चोरट्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह
Fast and traffic free travel from Vadape to Thane from May 2025 onwards
वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो सतर्क रहा; ‘या’ एक्सप्रेसच्या मार्गात बदल

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये उष्ण लहरी कमी मात्र पावसाळा, अति पाऊस वाढणार, संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल

समृद्धी महामार्गावर विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लेन शिस्त न पाळणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, वाहन अवैध ठिकाणी पार्किंग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन सुरक्षित न ठेवणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे आणि वाहन चालक सतर्क नसणे ही प्रमुख कारणे समृद्धी महामार्गावरील अपघातास कारणीभूत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.