नागपूर : पावसाळा सुरू होताच शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत आहे. मात्र, वाहतूक शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाहन चालकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहर वाहतूक पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे वारंवार अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, वाहतूक पोलीस सिग्नलवर न थांबता कोपऱ्यात घोळका करून सावज शोधत असतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाची भीती दाखवून दिवसभर चिरीमिरी घेण्यात वेळ घालवतात. हा सर्व प्रकार सामान्य नागरिक बघत असतो. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली असताना पोलीस वसुलीत व्यस्त असतात. त्यामुळेच शहरातील वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचा आरोप आहे.

Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
entrepreneurs staged rasta roko protest against pcmc for not picking up waste in bhosari midc
पिंपरी : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन
thane traffic marathi news
ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल
pune city traffic route changes marathi news
पुणे: शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद, मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल
Residents opposition to zopu scheme in Juhu Koliwada
जुहू कोळीवाड्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला रहिवाशांचा विरोध
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 

हेही वाचा – चंद्रपूर: शंभर वर्षात प्रथमच जुलै महिन्यात २४२ मिमी पाऊस

पोलिसांचा वचक संपला

रस्त्यावरील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते तसेच पदपाथावरील फुटकळ विक्रेते वाहतूक पोलिसांना महिन्याकाठी लाच देतात व पदपाथ विकत घेतल्यासारखेच वागतात. धरमपेठ, सातीबर्डी, सक्करदरा, बुधवारी बाजार, तुकडोजी चौक, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, अशोक चौक, धंतोली, मानस चौक, कॉटन मार्केट चौक, मंगळवारी बाजार, आयटी पार्क चौक, जयताळा बाजार आदी ठिकाणी हातगाडीवाले पदपाथावर भाजीपाला व फळे विक्री करतात. त्यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबते. मात्र, वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत.

विरुद्ध दिशेने वाहन दामटणाऱ्यांची संख्या वाढली

वाहतूक पोलिसांचा वचक संपल्यामुळे अनेक वाहनचालक सिग्नलचे पालन करीत नाहीत. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑटोचालक रस्त्याच्या मधोमध ऑटो थांबवून प्रवासी भरतात. थांबा नसलेल्या ठिकाणी रस्त्यावरच बस उभी करून खासगी बसचालक प्रवासी घेतात आणि उतरवतात. पोलीस असतानाही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.

हेही वाचा – वर्धा : शाब्बास! वन्यजिवांच्या हिताचे कार्य, वनमंत्र्यांनी थोपटली आमदारांची पाठ

तीन मिनिटांच्या प्रवासासाठी ३० मिनिटे

अजनी रेल्वे पुलावरून मेडिकल रुग्णालयाकडे जाताना केवळ तीन मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे. परंतु, सायंकाळी आणि सकाळी तेथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने तब्बल ३० मिनिटांचा वेळ लागतो. पाचपावली-इंदोरा पूल, रेल्वस्थानक पूल, सक्करदरा पूल आणि छावणी पुलाचीही स्थिती अशीच आहे.

अजनी पुलावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे, पूल अरुंद असून नवीन पूल होईपर्यंत तेथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या असेल. कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरते कठडेसुद्धा लावले आहेत. नेहमी वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे शोधली आहेत. तेथे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि गस्त वाढवली आहे. – विनोद चौधरी, प्र. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.