महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या परिवहन खात्याने १५ जानेवारीपासून राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत १३ जानेवारीला आदेश काढले. शनिवार, रविवारी सुट्टीमुळे या अभियानासाठी नवीन जनजागृती पत्रक छापण्यासह इतरही काही सोयी बऱ्याच कार्यालयांना करता आल्या नाहीत. काही जिल्ह्यांत नाममात्र उद्घाटन झाले, तर काहींनी नंतरच्या दिवसांत उद्घाटनाचे नियोजन केले आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

रस्ते अपघात कमी व्हावे, रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारने १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील परिवहन खात्याने अभियानाबाबत आधीच सगळ्या आरटीओंना सूचना देणे अपेक्षित होते. परंतु, १५ जानेवारीपासून राबवायच्या उपक्रमाचे १३ जानेवारीला आदेश काढले गेले. आदेश काढलेल्या दिवसादरम्यान शनिवार- रविवार सुट्टी आल्याने अचानक १५ जानेवारीपासून कार्यक्रम घेण्याबात आरटीओ अधिकाऱ्यांची दमछाक झाली. अनेक आरटीओ कार्यालयांना अभियानाच्या जनजागृतीसाठीचे पत्रक छापता आले नाही, तर काहींना १५ जानेवारीला उद्घाटन कार्यक्रमही घेता आले नाही. उद्घाटन घेतलेल्या कार्यालयांनी जुन्या प्रसिद्धी साहित्यांच्या जोरावर थातूरमातूर सोपस्कार केले. तर काहींनी येत्या एक-दोन दिवसानंतर उद्घाटनाचे नियोजन केले.

आणखी वाचा-वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी

या उपक्रमासाठी परिवहन खात्याला पोलीस विभाग, वाहतूक पोलीस शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सेवाभावी संस्था, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्रेते, पीयूसी सेंटर्स, वाहन उत्पादक कंपनी, विमा कंपन्यांनाही सोबत घ्यायचे आहे. परंतु, ऐन वेळेवर आदेश काढल्याने समन्वय झाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्राकडून १० जानेवारीला सूचना मिळताच सगळ्या आरटीओ कार्यालयांना रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सूचना दिल्या. १५ जानेवारीला मुंबईत मोठा कार्यक्रम झाला. त्यामुळे या दिवशी स्थानिक कार्यालयात कार्यक्रम झाला नसल्यास एक-दोन दिवस मागे पुढे होईल. -विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.