चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघाने तीन दिवसात तीन जणांचा बळी घेतला आहे. आज मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर बुधवार दुपारच्या सुमारास घडली. नानाजी निकेसर ५३, ढिवरू वासेकर ५५ असे मृत गुराख्याचे नाव आहे. मागील तीन दिवसात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा >>> भंडारा: वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
dead leopard found in wheat field in Nimbhore Phaltan causing excitement
फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

हेही वाचा >>> वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

चिंचाळा येथील गुराखी नानाजी व ढिवरू हे गुरे चारण्यासाठी चिंचाळा परिसरातील जंगलात गेले होते. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नानाजी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी नानाजीने आरडा-ओरड केल्याने ढिवरू वासेकर हा मदतीसाठी गेला. वाघाने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Story img Loader