चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघाने तीन दिवसात तीन जणांचा बळी घेतला आहे. आज मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर बुधवार दुपारच्या सुमारास घडली. नानाजी निकेसर ५३, ढिवरू वासेकर ५५ असे मृत गुराख्याचे नाव आहे. मागील तीन दिवसात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भंडारा: वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

हेही वाचा >>> वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

चिंचाळा येथील गुराखी नानाजी व ढिवरू हे गुरे चारण्यासाठी चिंचाळा परिसरातील जंगलात गेले होते. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नानाजी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी नानाजीने आरडा-ओरड केल्याने ढिवरू वासेकर हा मदतीसाठी गेला. वाघाने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two cowherds killed tiger attack in three days human wildlife struggle ysh