नागपूर : विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्याशिवाय भाजपाचा पराभव करणे अशक्य आहे. असा पराभव अपेक्षित असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊन जाण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आंबेडकर यांनी नागपुरातील रविभवन या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांना महाविकास आघाडीतबाबत विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावर सोडून दिली आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
dilip walse patil remarks on dhananjay munde resignation
वळसे पाटलांकडून मुंडेंची पाठराखण; मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याची भूमिका
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Dhananjay Munde excluded from list of Guardian Minister post Pankaja Munde faces challenge in Jalna
धनंजय मुंडे यांना धक्का, पंकजा मुंडेंसमोर जालन्यात आव्हान

हेही वाचा >>> “भाजपाची स्थिती कर्नाटकपेक्षा वाईट होईल” विजय वडेट्टीवार यांचा इशारा; म्हणाले…

महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. पटोले यांचे हे विधान म्हणजे आघाडीत बिघाडी दर्शवते. आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अहंकार थोडा कमी केल्यास भाजपाला पराभूत करणे सोपे आहे. परंतु काँग्रेस स्वत:ला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष मानण्याचा समंजसपणा दाखवेल असे दिसत नाही. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीत स्वागत असल्याचे म्हटले, पण जागा देऊ शकत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे आम्ही देखील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आम्ही आमचा मार्ग आखत आहोत.

हेही वाचा >>> गडचिरोली जिल्हा नियोजनावरून शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी, यादीतून शिवसेनेला वगळले

गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी ते काहीही करतील. त्यांनी आधीच शिवसेनेला कमकुवत केले आहे. आता त्यांचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडी आणि नाबार्डच्या अहवालाच्या आधावर नियंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. भारत जगात क्रमांक एकचा देश झाल्याचा दावा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार नाराज आहेत. त्यांनी त्यांची भारतातील गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्याचा परिणाम जुलैनंतर दिसू शकतो. भारतात आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सत्य देशाला सांगितले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

Story img Loader