लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: मामाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या भाच्याने मामाच्या मुलीला पळवून नेले. दोघेही एकाच वेळी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी भाच्याला अनेकदा फोन करुन विचारणा केली. मात्र, तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे मामा-मामी पोलीस ठाण्यात पोहचले. पाहुणा आलेल्या भाच्याने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

bjp and thackeray group united to work uday samant
पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात भाजपा आणि ठाकरे गट एकत्र काम करणार, बाळ माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
Long-standing consensual adulterous relationship not rape
“पती त्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणार नाही, तर मग..?” ; उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत काय म्हटलंय?
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
labor suicide contractor torture
ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
Abdul sattar
Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

रामटेकमध्ये पीडित १७ वर्षीय तरुणी स्विटी (बदललेले नाव) राहते. ती बाराव्या वर्गात शिकते. चार महिन्यांपूर्वी मामाच्या घरी भाचा चिंटू पाहुणा म्हणून आला. तो जवळपास ८ दिवस मामांकडे मुक्कामी थांबला. या दरम्यान मामाची मुलगी स्विटीशी जवळिक वाढली. चिंटूला स्विटी आवडायला लागली. त्यामुळे दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला. चिंटू हा गावी गेल्यानंतरही दोघेही व्हॉट्सअपवरून संपर्कात होते. यादरम्यान त्यांचे सूत जूळले. स्विटी कॉलेजला गेल्यानंतर तो तिला भेटायला येत होता. दोघांच्या नेहमी भेटी-गाठी व्हायला लागल्या. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… एसटी महामंडळाची बस उलटली, राजूर घाटातील घटना; सुदैवाने…

मात्र, कुटुंबीयांसोबत बोलण्याचे धाडस होत नव्हते. ५ जुलैला चिंटू मामाच्या घरी पाहुणा म्हणून आला. तब्बल पाच दिवस मामाकडे मुक्कामी थांबला. या दरम्यान दोघांनी अनेकदा प्रेमविवाह करण्याबाबत विचार केला. शेवटी कुटुंबीय विरोध करतील म्हणून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मामा-मामी शेतात गेल्यानंतर दोघांनीही घरातून पलायन केले. दोघेही मनसर येथे गेले. सायंकाळी मामा घरी आल्यानंतर भाचा आणि मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी गावात शोधाशोध केली. तसेच काही नातेवाईकांकडे विचारपूस केली. दोघेही पळून गेल्याची खात्री होताच मामा-मामीने थेट पोलीस ठाणे गाठले. बारावीतील मुलीला पळून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.