वर्धा : बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न. हताश सुशिक्षित बेरोजगार मग अन्य व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. शासनानेही अशांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वाटा शासकीय कामात राखून ठेवला. पण त्यावरही अन्य कोणी डल्ला मारत असेल तर हे बेरोजगार संतप्त होणारच. तसेच आज झाले. आर्वी बांधकाम विभागात कामे मिळत नसल्याची ओरड बेरोजगार अभियंते करतात. मंजूर कामांच्या निविदा ठराविक कंत्राटदारांना दिल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी वेळोवेळी कार्यकारी अभियांत्याकडे दाद मागितली. पण फायदा झाला नाही. म्हणून मग ते प्रहार सोशल फोरम या संघटनेचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्याकडे गेले. हे सर्व येणार म्हणून वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजरच राहले नाही. म्हणून या सर्व बेरोजगार अभियंत्यांनी त्यांचे पदवी प्रमाणपत्र कार्यकारी अभियंत्याच्या दालनपुढे भिरकावले . तसेच प्रवेशद्वारावर प्रमाणपत्रांचे तोरण बांधून निषेध व्यक्त केला. या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा