नागपूर : राहुल गांधींसारखे लोक विरोधी पक्षनेतेपदी असणे हा देशासाठी शाप आहे, अशी कठोर टीका संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केली. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रिजिजू म्हणाले, संविधान वाचलेले नाही किंवा ज्यांना त्याचा आत्मा समजलेला नाही, अशा व्यक्तीने संविधान हा शब्द उच्चारणेही संविधानाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने संविधानाला हात लावणे अयोग्य आहे. अशी व्यक्ती देशाच्या विरोधी पक्षनेतेपदी आहे, हे आमचे दुर्दैव आहे. ज्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांच्या तोंडी संविधान शब्द शोभत नाही, असेही रिजिजू म्हणाले.

हेही वाचा >>> ३५ निर्णय, १७१ शासकीय आदेश! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पुन्हा धडाका

Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…”
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

वक्फच्या जमिनी बळकावल्या

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत रिजिजू म्हणाले, सर्व जमीन देशाची आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी काहींनी बळकावल्या आहेत. त्या जमिनीचा दुरुपयोग झाला आहे. या माध्यमातून काही लोक कोट्यधीश झाले आणि बहुसंख्य मुस्लिमांना गरीब ठेवण्यात आले. यामुळे हे दुरुस्ती विधयेक आणण्यात आले आहे. काँग्रेसने केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाला मुस्लीम मंत्रालय केले होते.