नागपूर: ‘जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार’, अशा कठोर शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीवादावर भाष्य केले.गांधीवादी विचारक रघू ठाकूर यांच्या ‘गांधी- आंबेडकर कितने दूर कितने पास’ या पुस्तकाचे लोकार्पण प्रेस क्लबच्या सभागृहात शनिवारी झाले. याप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरेच शिष्टमंडळ मला येऊन भेटतात. मी कधीही जात- पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही.

हेही वाचा >>> आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हे मागे घेतले जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
NEW BORN GIRL
“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
loksatta kutuhal human friendly artificial intelligence
कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी
sharad pawar atheist marathi news
Sharad Pawar: “माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो”, शरद पवार म्हणाले…

आजच्या पिढीला भूतकाळातील संघर्षाची माहिती नाही. त्यामुळे आपण घरी एक विचार घेऊन चाललो असलो तरी ही पिढी वेगळाच विचार करताना दिसते. त्यामुळे सगळ्या विचारांमधील मूलभूत गोष्टी लुप्त होणार काय, हा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी, स्वावलंबत्व, स्वातंत्रासाठी खूप काम केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. त्यामुळे दोघांतील साम्यांचा विचार सा पुस्तकात आहे, असेही गडकरी म्हणाले. रघू ठाकूर म्हणाले, महात्मा गांधी यांच्याबाबत हल्ली खोट्या गोष्टी बोलल्या जातात. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातही वाद होते, असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात दोघांची काही मुद्यांवर मतभिन्नता होती. तरी दोघेही एकमेकांचा खूप आदर करायचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ब्रम्हानंद स्वाई, सुरेशबाबू अग्रवाल, एस. एन. विनोद, नचिकेता शर्मा, मंदाकिनी भिल उपस्थित होते.

हेही वाचा >>> आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हे मागे घेतले जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपुरुषांना समाजाचे लेबल अयोग्य शिवाजी महाराजांना मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित , महात्मा ज्योतिबा फुले यांना माळी, टिळकांना ब्राम्हण समाजाचे लेबल लावण्यात आले आहे. हा प्रकार योग्य नाही. राष्ट्रपुरुषांना आपण अशा विवादात टाकल्यास समाजातून मूलभूत गोष्टी नष्ट होतील. सध्या आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे कोणीही आमचा झेंडा घेते. जसे लोक तसे पक्ष आहे, अशी मिश्किल टिप्पणीही गडकरी यांनी केली.