नागपूर: वर्धा जिल्ह्यात बांबूपासून औष्णिक विद्युत प्रकल्पाला वीजनिर्मितीसाठी कोळशासारखा उपयोग होईल असा पांढरा कोळसा तयार करण्यात आला आहे. त्याचा वापर वाढल्यास उसाच्या दरात बांबूची विक्री होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपुरात ॲग्रोव्हिजन कृषिप्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री टागे टाकी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, खासदार रामदास तडस, दादाराव केचे, हरीश पिंपळे, टेकचंद सावरकर आणि इतर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, वर्धेतील एकाने बांबूला विशिष्ट आकारात कापण्याचे यंत्र तयार केले. त्याचे प्रदर्शन येथे आहे.

Swayam Parampje murder of construction businessman in Thane thane news
मैत्रिणीचे ‘ते’ छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून बांधकाम व्यवसायिकाची हत्या
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली
Three Walking yoga types to Include in Your Morning Walk – Viral Video
तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता? हे तीन प्रकार करा चालण्यात समाविष्ट, VIDEO एकदा पाहाच
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
transgender stealing gold worth rs 2. 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी

हेही वाचा… संत्र्याच्या आयात शुल्कातील निम्मा भार शासनाकडून; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सदर बांबूचा उष्मांक ४ हजार आहे. त्यावर चांगली वीज तयार होणे शक्य आहे. या पांढरा कोळशाचा वापर वाढल्यास बांबूची मागणी वाढेल. त्यातून कोळशावर चांगला पर्याय उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना उसाच्या दरात बांबूची विक्री करता येईल. शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेत उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. बजाज, हिरो, टीव्हीएस या कंपनीने इथेनॉलवर चालणारे वाहन तयार केले आहे. आता ऑटोरिक्षा, दुचाकी, कार इथेनॉलवर चालतील. त्यामुळे भविष्यात या वाहनामुळे आयात केलेल्या इंधनाचे १६ लाख कोटी वाचून त्यातील ५ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खिशात जाऊ शकत असल्याचेही गडकरी म्हणाले. याप्रसंगी इतरही पाहुण्यांनी त्यांचे मत मांडले.

स्पेनमधून आणलेला संत्र्याला लवकरच फळे

संत्र्याचे चांगले कलम आणि चांगले बियाणे शेतकऱ्यांना मिळायला हवे. त्यासाठी संत्रा संशोधन केंद्र चांगले काम करीत आहे. स्पेनमधून संत्र्याचे एक कलम आणले आहे. हे वृक्ष वाढत असून त्यातून लवकरच संत्री उपलब्ध होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.