वाशिम : विदर्भातील वाशीम आणि गडचिरोली जिल्हा निती आयोगाने निकाषानुसार मागास आणि अकांक्षित जिल्हे म्हणून घोषीत केले आहे. ही बाब माझ्यासह सर्वांसाठी अभिमानाची बाब नाही. त्यामुळे मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे. राजकारणात खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर चांगले काम केले असेल तर लोक तुम्हाला मानतात त्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याची काहीच गरज काय ? असा टोला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला..

हेही वाचा >>> सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल

baheliya gang hunted more than 25 tigers in maharashtra in two years
दोन वर्षांत २५ वाघांची शिकार; बहेलिया टोळीच्या राज्यात कारवाया
Police seize Rs 6 to 7 crore worth of cash from Rajkamal Laundry in Indira Nagar Tumsar
भंडारा: खळबळजनक! लॉन्ड्रीतून मिळाले ७ कोटी; रक्कम कुणाची?
England vs India match Cricket bookies active for betting Nagpur news
इंग्लंड विरुद्ध भारत : सट्टेबाजीसाठी क्रिकेट बुकी सक्रिय; दोन हजार कोटींपेक्षा जास्त…
Nagpur Police smart experiment to provide instant information about crimes
कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळेल पाच मिनिटांत! नागपूर पोलिसांचा ‘स्मार्ट’ प्रयोग
no alt text set
VIDEO: तेल गेले, तूपही गेले..! चोरट्यांनी एटीएमला चक्क दोरीने बांधून…
Fire breaks out on ground floor of apartment in Akola 11 two-wheelers gutted
अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…

वाशीम जिल्ह्यातील ३६५५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच ५९५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भुमीपुजन सोहळा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी,लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., माजी आमदार विजय जाधव, राजगुरू, जिल्हाध्यक्ष श्याम बढे, राजू पाटील राजे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मगासलेपणाचा जिल्ह्याला लागलेल्या डाग सर्वच नेत्यांसाठी भूषणावह नाही. त्यामुळे जिल्हाला विकसित करण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन एक दिलाने काम करा. रस्त्यामुळे विकासाला चालत मिळत आहे. जिल्ह्यात चांगले रस्ते झाले पाहिजे. पण तरीही काही कंत्राटदारांना त्रास दिला जातो. मी कितीही पैसे द्यावला तयार आहे. असे म्हणताच उपस्थितांमधून एकच हाश्या पिकला तर काहींनी टाळ्याची साद दिली.

हेही वाचा >>> क्यूआर कोडशिवाय जाहिराती, ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा

जिल्ह्यातील एकमेव आणि बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करण्याची एकमुखी मागणी जिल्ह्यातील लोक प्रतीनिधिनीनी गडकरी यंचाकडे केली असता सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आज केंद्रीय मंत्री जिल्ह्यात आले होते. ते ज्या मार्गाने कार्यक्रम स्थळी आले तो रस्ता अत्यंत दर्जाहीन असल्याचे सांगून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. व नव्याने सिमेंट रस्ता बांधून देतो ज्यावर पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत, असे ही गडकरी म्हणाले.

Story img Loader