काँगेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही खऱ्या अर्थाने ‘भाजपा जोडो’ यात्रा असल्याचा खळबळजनक विधान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. त्यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेच्यावतीने बुलढाण्यात वंजारी समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कराड यांनी हे वक्तव्य केलं.

ते पुढे म्हणाले, राहुल गांधीची यात्रा महाराष्ट्रात आली आहे. ते जेवढे फिरतील तेवढा त्याचा लाभ भाजपला होईल. आतापर्यंतचा इतिहास आहे की, राहुल गांधी ज्या-ज्या राज्यात गेले त्या-त्या राज्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. त्यांची भारत जोडो यात्रा ही नावापुरतीच आहे. ही खरेतर त्याला भाजपा जोडो यात्रा म्हणता येईल. कारण, राहुल गांधी हे त्यांच्याच पक्षाचे नुकसान करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

Chief Minister Eknath Shinde statement regarding development of bullet train in Maharashtra
मुख्यमंत्री म्हणतात, “महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास…”
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
Tembhu Yojana sixth phase BJP and Ajit Pawar group members ignored farmers meeting organized by Shiv Sena Shinde group
मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
Skywalk for vitthal rukmini Darshan in Pandharpur Approval of the Summit Committee headed by the Chief Minister
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!

हेही वाचा- पुलंच्या स्मृतींचा जगभरात जागर; वर्षभर रंगणाऱ्या ‘ग्लोबल पुलोत्सव’ची घोषणा

गोपीनाथ मुंडेंमुळे वंजारी समाजाला देशपातळीवर ओळख

वंजारी समाज मेळावा व गुणवंत सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कराड म्हणाले की, काही दशकांपूर्वी सर्वच दृष्टीने अविकसित व मागासलेल्या वंजारी समाजाला दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच देश पातळीवर ओळख मिळाली. गोपीनाथ मुंडे यांनी समाजासाठी संघर्ष करीत, केवळ ओळख न देता समाजबांधवांमध्ये आत्मविश्वास, दुर्दम्य आशावाद निर्माण केला. यामुळे आज सर्वच क्षेत्रात समाजातील व्यक्ती आपल्या कर्तबगारीने तळपत असल्याचे ना. कराड यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘राजकीय पक्षांनी नेत्यांसाठी आचारसंहिता तयार करावी’; चंद्रकांत पाटील यांची सूचना

‘जी-२०’ परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण

विदर्भ वंजारी समाज मेळाव्यानिमित्त येथे दाखल झालेल्या अर्थ राज्यमंत्री कराड यांनी आपले भाषण आटोपते घेत, जी-२० परिषदेच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमा ‘ऑनलाईन’ हजेरी लावली. जी- २० राष्ट्रांची परिषद पुढील वर्षी २००३ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली आहे. या प्रस्तावित परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.