अकोला : जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळीमुळे सर्वत्र जलमय परिसर झाला. वादळी वाऱ्यामुळे विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागांत तसेच शहरात वादळी वारा सुटला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये शिरले.

pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक
viral video elederly man playing on a jumping jack video goes viral on social media
“आयुष्य एकदाच मिळते मनसोक्त जगा” जपिंग-जपांगमध्ये आजोबांनी लहान मुलांसारखा घेतला आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO

हेही वाचा – सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा…

हेही वाचा – नागपूर : लॉजमध्ये प्रेयसीवर बलात्कार, अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

वादळी वाऱ्यामुळे शहरातील जठारपेठ, रामदासपेठ, उमरी, सिव्हिल लाईन, जुने शहर, डाबकी रोड, गोरक्षण, मलकापूर भागात काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या होत्या. अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहेत. खरीप हंगामातील कापूस, तूर पिकासह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader