वाशिम : विदर्भात रविवारी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने कुठे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

रविवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढग दाटून आले. दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार, तराळा, तपोवन भागात जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात कांदा, बीजवाई कांदा व इतर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. बहुतांश ठिकाणी फुलावर आलेला बीजवाई कांदा अवकाळी पावसामुळे आडवा झाला तसेच इतर पिकांचेदेखील अतोनात नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.

thane concrete piles on nitin company flyover threaten green belt and tree roots
ठाण्यातील महामार्गावरील दुभाजकामधील वृक्षांवर काँक्रीटचा थर, काँक्रीट थरामुळे हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Contractual workers of Navi Mumbai civic body to launch strike for equal pay
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून  कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
Wheat crop production is likely to increase in Indapur taluka |
इंदापूर तालुक्यात गव्हाचे पीक जोमदार; रब्बी हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती समाधानकारक, गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

हेही वाचा…राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता

जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार, शिवनी, वनोजा, पेडगाव परिसरात फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा फळबागेचे प्रचंड नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर दगावले होते. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली. या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी नव्याने कांदा, बीजवाई कांद्याची लागवड केली. मात्र, पुन्हा एकदा काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झालेला आहे.

Story img Loader