वर्धा: रात्रीपासून पावसाची सततधार शेतकऱ्यांची दैना करणारी ठरत आहे. पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसाचे आगार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. पण पावसाने ही ओळख मिटविण्याचा चंगच बांधल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढरे झालेले शेतशिवार ओलेचिंब झाले. कापसाचा वेचा मजुराअभावी शेतातच पडून होता. तो भिजला. वेचन व्हायची असलेल्या शेतातील कापूस आडवा झाला.

हेही वाचा… अमरावती: सराफा व्‍यावसायिकाची घरात शिरून हत्‍या, दागिनेही लंपास

तुरीच्या पिकास चांगला बहार आलेला असतांनाच या वातावरणामुळे अळ्या पडण्याची भीती वाढली आहे. गळून पडणारा कापूस व तुरीच्या शेंगा आर्थिक गणित बिघडविनार. या खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान आधीच होवून गेले.आता हा दोन दिवसापासून झडणारा पाऊस तोंडचे पाणी पळविेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rains caused huge damage to cotton in the fields in wardha pmd 64 dvr
Show comments