लोकसत्ता टीम

अमरावती : पश्चिम विदर्भात गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसाने १ लाख ७३ हजार ३२६ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक १.२६ लाख हेक्टरमध्ये नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाकडे पाठवली आहे.

Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
increase in house burglaries in western Vishnunagar police station limits of Dombivli since last week
डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या वाढल्याने नागरिक हैराण
Heavy rains in Akola damaged crops over 57 758 5 hectares in August and September
अकोला : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिके मातीत; ऐन सणासदीच्या काळात….
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे
article about survey of internet users in rural and urban area of india
डेटाखोरीचे जग…
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..

गेल्या तीन दिवसांमध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतीच्या नुकसानासोबतच जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.

आणखी वाचा-बहुतांश मागण्या मान्य, उर्वरित मांगण्याची महिन्याभरात पूर्तता; रविकांत तुपकरांचे ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३७ हेक्टर शेतजमिनीवरील पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३३ हजार ९५१ हेक्टर शेती पाण्यात गेली आहे. अकोला जिल्ह्यातील १० हजार ४६५ हेक्टर आणि वाशीम जिल्ह्यातील ४६२ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात तीन दिवसांत शेतीपिकांच्या नुकसानीची नोंद नाही.

आणखी वाचा-वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी सापडला साताऱ्यात

रविवारी बुलढाणा जिल्ह्यात ३३ हजार ९५१ हेक्टरमध्ये, तर वाशीम जिल्ह्यात ४६२ हेक्टरमधील शेतजमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे अहवालात नमूद आहे. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात २०११ हेक्टरमध्ये, अकोला ४६०८ हेक्टर आणि मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार हेक्टर आणि अकोला जिल्ह्यात ५ हजार ८५७ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे २६ नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अमरावती विभागात ५७१ जनावरे दगावली आणि १०१ घरांची पडझड झाली.