चंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) ‘ओव्हरबर्डन’मुळे शहराची जीवनवाहिनी इरई, झरपट व उमा नदीचे पात्र बाधित झाले आहे. नदीचे पाणी व हवा प्रदूषित झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यातही नदीपात्राच्या विद्रुपीकरणास वेकोलिला जबाबदार धरले आहे. यामुळे ६९३ कोटींचा शिल्लक असलेला खनिज विकास निधी इरई व झरपट नदी संवर्धन व विकासाकरिता उपयोगात आणावा, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली.

पुगलिया यांनी यासंदर्भात पत्रपरिषदेत विस्तृत माहिती दिली. वेकोलिच्या ‘ओव्हरबर्डन’मुळे इरई, झरपट व उमा या तीनही नद्यांचे पात्र बाधित झाले आहे, असे तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. राज्याच्या पाणीपुरवठा विभागानेही याच कारणामुळे नद्या प्रदूषित झाल्याचा अभिप्राय दिला आहे. यामुळे इरई व झरपट या दोन्ही नद्यांचे खोलीकरण वेकोलिकडून करून घ्यावे. इरई नदीवर चार तर झरपट नदीवर २.५ किलोमीटर संरक्षण भिंत तयार करावी, यामुळे नद्यांचे संरक्षण होईल आणि यामुळे इरई धरणाचे पाणी सोडले तर चंद्रपूरसह नदीकाठावरील गावांना पुराचा धोका उद्भवणार नाही.

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
report on climate change reveals power of mosquito increases four times more
हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड
reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य
vijay wadettiwar criticized shinde govt
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
Pune, Bhagyashree Navatke, Economic Offenses Wing, Jalgaon, embezzlement, bhaichand hirachand raisoni, BHR Credit Union, Home Department,
‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपीची गृहखात्याकडे तक्रार

हेही वाचा : वर्धा : सर्पमित्रांचा नवाच फंडा, घरात साप सोडायचा अन् पुरस्कार लाटायचा…

‘ओव्हरबर्डन’मुळे नदीपात्रालगत मातीचे मोठे ढिगारे तयार झाले आहेत. ते २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून तेथेच आहेत. त्यातील वाळू मिश्रीत माती नदीपात्रात जात असल्यामुळे पात्र संकुचित झाले आहे. ‘ओव्हरबर्डन’मुळे या नद्या क्षतीग्रस्त झाल्या असून पावसाळ्यात पाणी प्रदूषण व पूरस्थिती निर्माण होते. हिवाळ्यात व उन्हाळ्यात मातीच्या या ढिगाऱ्यांमुळे वायू प्रदूषण होते. कोळसा काढल्यानंतर रिकाम्या खाणीत मातीचे भरण भरून तिथे व मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झाडे लावावी व खुल्या कोळसा खाणीत जमा झालेल्या पाणी साठ्याचा उपयोग ‘लिफ्ट एरीगेशन’साठी करावा, अशा मागण्या पुगलिया यांनी केल्या आहे. पत्रपरिषदेला युवा नेते राहुल पुगलिया, ॲड. अविनाश ठावरी, माजी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले उपस्थित होते.

हेही वाचा : शासकीय कामांना लाचेची कीड; पश्चिम विदर्भात लाचखोरीची ‘पन्नाशी’; पैसे दिल्याशिवाय…

६९३ कोटींचा निधी शिल्लक

खनिज विकास निधीचा ‘मायनिंग एरिया’च्या २० किलोमीटर परिसरात वापर करावा, असे शासनाचे निर्देश आहे. यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ६९३ कोटींचा शिल्लक खनिज विकास निधी नियमानुसार इरई व झरपट नदी संवर्धनावर खर्च करावा, अशी मागणी पुगलिया यांनी केली. ज्या कामांना केंद्र व राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो, अशा कामांवर खनिज विकास निधी खर्च करावा. त्याचा गैरवापर करण्याऐवजी आवश्यक नदी संवर्धनावर खर्च करावा, अशी अपेक्षा पुगलिया यांनी व्यक्त केली.