लोकसत्ता टीम

वर्धा : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर संतप्त होत कडक कारवाई करण्याचे आदेश उपस्थितंसमोर देत असतील तर प्रकरण निश्चितच गंभीर असणार. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक हे आपल्या सहकाऱ्यासोबत फडणवीस यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. वर्धा जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेती चोरी होत आहे. त्याला पायबंद घालावा अशी लेखी मागणी या भेटीत करण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना त्याचवेळी थेट फोन लावला. रेती माफियावर कठोर कारवाई करा. प्रसंगी मोक्का लावा पण सोडू नका, असे आदेश फडणवीस यांनी लगेच दिल्याचे पाठक म्हणाले.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta anvyarth N Chandrababu Naidu ED Skill development scam
अन्वयार्थ: तेव्हा भ्रष्ट, आता स्वच्छ…
Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…
Jayant Patil, Jayant Patil news, Jayant Patil latest news,
जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
woman reacted ruckus inside the office of Devendra Fadnavis
Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”
youth leader Shinde group, Shinde group Dombivli,
डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा, बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा, श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

या वेळी रेती चोरीबाबत माहिती देण्यात आली. शासनाने नावे रेती धोरण अंमलात आणले. त्यानुसार बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सहाशे रुपये प्रती ब्रास रेती मिळणे अपेक्षित आहे.मात्र त्यापेक्षा अधिक दर आकारल्या जात आहे. सध्या अवैधपणे मोठ्या प्रमाणात रेती उपसा हिट आहे. ही चोरीची रेती सहा हजार रुपये प्रती ब्रास अश्या दराने उपलब्ध आहे. हा काळाबाजार सरसकट सूरू असून अवैध कमाई करण्यासाठी ओव्हर लोडींग केल्या जाते. दोन ब्रास रेतीचा परवाना असला तरीही चार ब्रास रेती उपसा होतो. या चोरीकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे उघड दिसून येते. बाजारात उपलब्ध ही चोरीची रेती बांधकाम धारकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे भुर्दंड पडत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

आणखी वाचा-अमरावती विभागात सोयाबीन उत्‍पादकही संभ्रमावस्‍थेत, बियाणे महागले; उगवण क्षमता…

ज्या रेती वाहून नेणाऱ्या वाहनाची नोंद महसूल अधिकाऱ्या कडे झाली असते, अश्या गाड्यांना सोडून दिल्या जात आहे. रेती डेपोच्या आडून थेट नदी पत्रातून बोटीत व पोकलंड टाकून उपसा सुरू आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये किमतीची रेती चोरी होत आहे. नदीपात्र भकास होत चालले आहे. याविषयी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.मात्र दखल घेतल्या गेली नाही. उलट रेती माफिया दादागिरी करतात. तक्रार केल्यास नदीपात्रात गाडून टाकण्याच्या धमक्या मिळतात. त्यामुळे गावकरी पण या माफियांच्या दहशतीत जगत आहेत. याला वेळीच आवर बसला पाहिजे, अशी विनंती युवा नेत्यांनी केली. त्याची तात्काळ दखल घेत गृहमंत्री फडणवीस यांनी मोक्का लावण्याची सूचना केल्याचे पाठक यांनी सांगितले. युवा मोर्चाचे पृथ्वीराज शिंदे, अनिकेत भोयर, शिवानी दाणी, सचिन भोयर हे उपस्थित होते.