लोकसत्ता टीम

वर्धा : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर संतप्त होत कडक कारवाई करण्याचे आदेश उपस्थितंसमोर देत असतील तर प्रकरण निश्चितच गंभीर असणार. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक हे आपल्या सहकाऱ्यासोबत फडणवीस यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. वर्धा जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेती चोरी होत आहे. त्याला पायबंद घालावा अशी लेखी मागणी या भेटीत करण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना त्याचवेळी थेट फोन लावला. रेती माफियावर कठोर कारवाई करा. प्रसंगी मोक्का लावा पण सोडू नका, असे आदेश फडणवीस यांनी लगेच दिल्याचे पाठक म्हणाले.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Pm Narendra Modi Speech in Rajayasabha
Pm Narendra Modi : “काँग्रेससाठी गाणं न म्हटल्याने किशोर कुमार यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद” झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

या वेळी रेती चोरीबाबत माहिती देण्यात आली. शासनाने नावे रेती धोरण अंमलात आणले. त्यानुसार बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सहाशे रुपये प्रती ब्रास रेती मिळणे अपेक्षित आहे.मात्र त्यापेक्षा अधिक दर आकारल्या जात आहे. सध्या अवैधपणे मोठ्या प्रमाणात रेती उपसा हिट आहे. ही चोरीची रेती सहा हजार रुपये प्रती ब्रास अश्या दराने उपलब्ध आहे. हा काळाबाजार सरसकट सूरू असून अवैध कमाई करण्यासाठी ओव्हर लोडींग केल्या जाते. दोन ब्रास रेतीचा परवाना असला तरीही चार ब्रास रेती उपसा होतो. या चोरीकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे उघड दिसून येते. बाजारात उपलब्ध ही चोरीची रेती बांधकाम धारकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे भुर्दंड पडत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

आणखी वाचा-अमरावती विभागात सोयाबीन उत्‍पादकही संभ्रमावस्‍थेत, बियाणे महागले; उगवण क्षमता…

ज्या रेती वाहून नेणाऱ्या वाहनाची नोंद महसूल अधिकाऱ्या कडे झाली असते, अश्या गाड्यांना सोडून दिल्या जात आहे. रेती डेपोच्या आडून थेट नदी पत्रातून बोटीत व पोकलंड टाकून उपसा सुरू आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये किमतीची रेती चोरी होत आहे. नदीपात्र भकास होत चालले आहे. याविषयी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.मात्र दखल घेतल्या गेली नाही. उलट रेती माफिया दादागिरी करतात. तक्रार केल्यास नदीपात्रात गाडून टाकण्याच्या धमक्या मिळतात. त्यामुळे गावकरी पण या माफियांच्या दहशतीत जगत आहेत. याला वेळीच आवर बसला पाहिजे, अशी विनंती युवा नेत्यांनी केली. त्याची तात्काळ दखल घेत गृहमंत्री फडणवीस यांनी मोक्का लावण्याची सूचना केल्याचे पाठक यांनी सांगितले. युवा मोर्चाचे पृथ्वीराज शिंदे, अनिकेत भोयर, शिवानी दाणी, सचिन भोयर हे उपस्थित होते.

Story img Loader