नागपूर : विदर्भात यावर्षीच्या हंगामात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा ३५२ टक्के अधिक पावसाची नोंद विदर्भात करण्यात आली आहे. यात सर्वाधिक विक्रमी १४४.१ मिलिमीटर पाऊस यवतमाळमध्ये तर त्यानंतर १३३.८ मिलिमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होते. या कालावधीत ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली विदर्भाने पाहिली आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तिनही महिन्यात कमाल तापमानाचा पारा चढलेला असतो. मात्र, यावर्षी सूर्यनारायण अवघ्या काही काळासाठी आणि अधूनमधून अवतरला. त्यातही तापमान मात्र ४५ अंश सेल्सिअसदरम्यान केले. दरम्यान, अवकाळी पावसाने सूर्यनारायणावर मात केली आणि जेव्हा तापमान वाढले, तेव्हा अवकाळी पाऊस अवतरला. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील पावसाची आकडेवारी पाहिल्यास विदर्भात एकूण ७३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जेव्हा की याच कालावधीत साधारणपणे १६.३ मिमी पाऊस पडतो. म्हणजेच या महिन्यांत सरासरीपेक्षा ३५२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळमध्ये १४४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा ७३३ टक्के जास्त आहे.

हेही वाचा : बुलढाण्यावर पाणी टंचाईचे सावट! येळगाव धरणात १५ टक्के जलसाठा

नागपूर जिल्ह्यात ४३५ टक्के अधिक १३३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अकोल्यात २८.१ मिलिमीटर, अमरावतीमध्ये ५७.५ मिलिमीटर, भंडारा ९०.३ मिलिमीटर, बुलढाणा २९.७ मिलीमीटर, चंद्रपूर ८३.२ मिलिमीटर, गडचिरोली २९.८ मिलिमीटर, गोंदिया ८७.५ मिलिमीटर, वर्धा ४५ मिलिमीटर, वाशीममध्ये ५२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाच्या दिवसांची संख्या जास्त आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी अवकाळी पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा : यवतमाळ: अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; घरकुलाच्या निधीसाठी तरुणाने उचलले पाऊल

हवामान बदलाचा फटका

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कापूस, सोयाबीन, संत्रा ही या भागातील प्रमुख पिके आहेत. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि त्याचा वाईट परिणाम झाला आहे. याशिवाय इतर पिकेही अवकाळी पावसाने वाहून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान अभ्यासकांच्या मते अवकाळी पावसामागे हवामान बदल हेच मोठे कारण आहे. त्यामुळेच यंदा ३५२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha recorded 352 percent more rainfall than the average in march april and may rgc 76 css
Show comments