लोकसत्ता टीम

नागपूर: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकशाही कडून हुकुमशाही वाटचाल सुरू आहे. कायदा फक्त विरोधकांसाठी आहे. लोक मरू द्या, पण निरव मोदी सारख्या माणसाला चोर म्हणून नका तर साहेब म्हणा असे म्हणण्याची सुरुवात देशात झाली आहे, अशी उपरोधिक टीका माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil : “सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत…”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
challenge for new Guardian Minister Chandrashekhar Bawankule is to maintain goodwill of leaders of constituent parties in mahayuti
अमरावतीत पालकमंत्र्यांसमोर महायुतीतील घटकांना सांभाळण्याचे आव्हान

वडेट्टीवार शनिवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. निरव मोदी आणि ललित मोदी यांचा अपमान केला असे भाजप म्हणत असेल तर ते भाजपच्या दृष्टीने ओबीसींचे फार मोठे नेते आहेत. ओबीसींचे नेते देशाबाहेर पळून गेल्यामुळे ओबीसी जनता दु:खी झाली. त्यामुळे त्यांना परत सन्मानाने भारतात बोलवावे. ललित आणि निरवला आम्ही आता चोर म्हणणार नाही. आम्ही आमचे नेते मानून त्यांचा स्वागत व सत्कार करू. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे सोमवारपासून देशभरात तीव्र आंदोलनाची सुरवात होणार आहे. त्या दृष्टीने बैठका घेतल्या जात आहेत. भाजपने लोकसभेत प्रवेश नाकारला, पण लोकांच्या मनातून राहुल गांधी यांना कसे काढणार? भाजपला हे अडचणीचे ठरणार असून जनता माफ करणार नाही.आम्ही आंदोलन करू, जेलभरो करू, रस्त्यावर उतरू, काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

आशीष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा

आशीष देशमुख यांनी कुठलेही विधान केले तरी त्यांना काँग्रेसकडून फारसे महत्त्व दिले जात नाही. ते इतके मोठे नाही की त्यांच्या भूमिकेवर भाष्य करावे. आशीष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Story img Loader