नागपूर : महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पण, आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या निधी वाटपावरून लाथाळ्या वाढतील. हे तिघेही एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

निधी वाटपावरून भेदभाव केला जात आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही. याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती सरकारने दिली आहे. आता सत्तेत सहभागी असलेल्यांमध्ये निधी वाटपावरून लाथाळ्या वाढणार आहेत.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
vijay wadettiwar on deepak kesarkar
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…”

हेही वाचा – “अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची अट…” वडेट्टीवार यांचा दावा

हेही वाचा – गडचिरोली: कामचुकारपणा भोवला; शिपाई वगळून अख्खे उपविभागीय कार्यालय निलंबित

पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. भविष्यात पाण्याची टंचाई होईल. पण सरकार सभा घेण्यात व्यस्त आहे. दुष्काळी स्थितीकडे सरकारने दुर्लक्ष झाल्यास लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असेही ते म्हणाले.