वर्धा : पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची भावना आता लहान गावात पण पोहचल्याचे हे उत्साहवर्धक उदाहरण. शहरातील सांडपाणी नदीत जाणार नाहीच, अशी ठाम व ठोस हमी हिंगणघाटकरांना लेखी स्वरूपात मिळाली आहे. वणा नदी ही या गावची जीवनदायीनी. मात्र त्यात बारा हजार घरातून निघणारे सांडपाणी सोडल्या जात होते. हे मोठ्या प्रमाणातील दूषित पाणी नदीस प्रदूषित करीत असल्याचे पाहून वणा नदी संवर्धन समिती नागरिकांनी स्थापित केली.कित्येक वर्षांपासून या घाण पाण्याचा प्रवाह अस्वस्थ करणारा ठरला. हे दूषित पाणी अन्य ठिकाणी वळवावे म्हणून समितीने तिरंगा हाती घेऊन आंदोलन केले. घाण पाण्यात कार्यकर्ते कित्येक तास उभे राहले. त्याची अखेर दखल झाली. पालिकेचे काही अधिकारी आश्वासन घेऊन आले. या विषयावर बैठक घेऊन चर्चा करू, अशी लेखी हमी मिळाली. आंदोलन मागे घेण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा