गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती असून शेकडो गावे संकटाच्या सावटात आहे. १०० टक्के भरलेल्या दहा मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या ७५ दारांतून तसेच २० छोट्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या १२ ऑगस्टला वर्धा तालुक्याच्या विशेष पाहणीसाठी येणार आहेत.

सततच्या मुसळधार पावसाने सर्व धरणं तुडुंब भरली आहेत.त्यामुळे धोका टाळण्यासाठी पाणी सोडण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ सांगतात.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
pradhan mantri awas yojana, funds , private developers ,
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

अभूतपूर्व असे संकट जिल्ह्यातील बारा नदीकाठच्या २२४ गावांवर कोसळले आहे. त्यापैकी ९६ गावे अतिजोखमीची असल्याने त्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन, उन्नई, लाल नाला, कार व सुकळी १०० टक्के भरले असून उर्वरित अंशी टक्के भरलेल्या प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे. हराशी, अंबाझरी, उमरी, मलकापूर, दहेगाव व अन्य एकूण वीस प्रकल्पातून पाणी वाहू लागले आहे. या विसर्गाचे नियोजन साधून अधिकाधिक गावांना पुरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी सांगतात.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शुक्रवारी आगमन पक्के असून पुराच्या अनुषंगाने मदत देण्याबाबत भूमिका मांडणार असल्याचे आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले.

Story img Loader