वर्धा : गुन्हा करीत पोबारा करणारे अनेक आरोपी असतात. त्यांचा शोध घेता घेता पोलिसांच्या नाकी नऊ येतात. महिने उलटतात, तेव्हा कुठे आरोपी हाती लागण्याची उदाहरणे दिसतात. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी चार व्यक्तींना उडवून पळ काढणाऱ्या एका ट्रक चालकास आठच दिवसात पकडून आणण्याची कामगिरी पोलिसांनी यशस्वी करुन दाखविली आहे. या दिवशी देवळी तालुक्यातील इंजापूर येथून एक ऑटोरिक्षा पुलगावकडे निघाली होती. रस्त्यात केळापूर येथे एक तरुणी, दोन पुरुष व दोन स्त्रिया या ऑटोत बसल्या. पुढे एक किलोमीटर अंतरावर हा ऑटो असतांना त्यास एका ट्रक कंटेनरची त्यास धडक बसली. या भीषण अपघातात चार व्यक्तींचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा