नागपूर : राज्यातील तापमानाने एकीकडे चाळीशी पार केली असताना दुसरीकडे राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे तापमानात देखील वाढ होण्याचा संकेत देण्यात आला आहे. विशेषकरुन विदर्भाला वाढत्या तापमानाचा तडाखा अधिक बसणार आहे.

नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. नागपूर शहराच्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून त्यात आणखी दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात चंद्रपूर आणि ब्रम्हपूरी या दोन शहरांमध्ये सर्वाधिक तापमानासाठी चढाओढ सुरू आहे. या शहरातचे तापमान ४२-४३ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला नागपूर वेधशाळेने दिला आहे.

firecrackers banned in delhi
‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Coconut expensive due to Wayanad landslides Mumbai news
वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग
Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी
rain Maharashtra, rain news, Maharashtra weather,
राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?

हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला असून दुसरीकडे गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झाले आहे. सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.