वाशिम : शुक्रवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी कडक उन तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. लग्नसराई असून त्यातच पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा काही भागात अवकाळी पाऊस झाला तर बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट सुरु होता. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. सर्वत्र कडक उन तापत असून वाढत्या उकड्याने अंगाची लाही लाही होत असून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
maharashtra recorded 29 percent more rainfall than average
Rainfall In Maharashtra : राज्यात २९ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत किती पाऊस पडला
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग
Dengue, Raigad district, Panvel Dengue,
रायगड जिल्ह्यात डेंग्यू बळावला; पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला

हेही वाचा – यवतमाळात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीची दहशत; १५ दिवसांपासून…

हेही वाचा – एसटी महामंडळात गर्दीचा हंगाम पाहून कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई? झाले असे की…

लग्न सोहळ्यावर संकट

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लग्नाची धामधूम सुरु आहे. मात्र पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. यामुळे अनेकांचे नियोजन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.