यवतमाळ : उन्हाळा सुरू होत असल्याने नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव निर्माण होत आहे की, काय असे मथळा वाचून वाटू शकते. या महामार्गावर यवतमाळ शहराबाहेर वनवासी मारोती चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाने पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटल्याने जलतरण तलाव निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना लिकेजमधून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यवतमाळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर आर्णी रोडवर वनवासी मारोती चौकात उड्डाणपुलाचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. त्यासाठी जुन्या मार्गालगत जीवन प्राधिकरणची मोठी पाईपलाईन टाकलेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा