अमरावती : मोसमी पावसाच्या आगमनाची महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत अमरावती विभागात जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. २५ गावांसाठी २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महिनाभरात अकरा टँकर वाढले आहेत. सर्वाधिक १७ टँकर बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहेत.

अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्यात चिखलदरा तालुक्यात तीन ठिकाणी आणि चांदूर रेल्वे तालुक्यात एका ठिकाणी टँकर सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १६ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा व देव्हारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय सावरगाव माळ (सिंदखेडराजा), पोखरी, तपोवन (मोताळा), वरवंड (मेहकर), धोडप, डोंगरशेवली (चिखली), किनगाव जट्टू (लोणार) या गावातही टँकर सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये तर वाशीम जिल्ह्यातील एका गावाला टँकरने पाणी पुरवले जात आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
due to Atal Setu and Uran Nerul Local are supplying lowpressure water to high rises buildings in Dronagiri
द्रोणागिरी नोड मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, सिडकोवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?

हेही वाचा – मुंबईत फडणवीस – ठाकरे भेट, नागपुरात भाजपाकडून मनसेला खिंडार

पश्चिम विदर्भातील १० मोठ्या‎ प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ४१.९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.‎ सर्वाधिक ४६५.९९ दलघमी जलसाठा यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणात, त्या खालोखाल २५० दशलक्ष घनमीटर जलसाठा अमरावती ‎जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात, तर ‎सर्वात कमी म्हणजे १०.२० दलघमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात‎ आहे.‎

Story img Loader