लोकसत्ता टीम

चंद्रपूर : वाळू, कोळसा, दारूतस्करी व अवैध व्यवसायांमुळे शांतताप्रिय चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतून बंदूक, देशी बनावटीच्या पिस्तुलांसह इतर शस्त्रांचा साठा चंद्रपुरात येत आहे. या शास्त्रांचा सर्रास वापर होत असल्याने गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात बंदूक बाळगल्याप्रकरणी ८ तर तलवार बाळगल्याचे ४८ गुन्हे दाखल आहे.

union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Param Rudra supercomputers
यूपीएससी सूत्र : अरुणाचल प्रदेशातील शिखराला दलाई लामांचे नाव अन् परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स, वाचा सविस्तर..
Police found gangster Somnath Gaikwad bought nine pistols from Madhya Pradesh to kill Vanraj Andekar
वनराज आंदेकरांच्या खूनापूर्वी दीड महिने आधी पिस्तूल खरेदी, मध्य प्रदेशातून पिस्तूले आणल्याचे उघड
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
lokmanas
लोकमानस: घोषणांनी, वायद्यांनी राज्याचा विकास होईल?
Loksatta vyaktivedh first Kashmiri Muslims Mohammad Shafi Pandit passed away
व्यक्तिवेध: मोहम्मद शफी पंडित
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…

एकेकाळी ‘शांत शहर’ म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. कालांतराने जिल्ह्यात वाळू, कोळसा, दारूची अवैध तस्करी सुरू झाली. ती आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तस्करी आणि वर्चस्वाच्या लढाईतून उत्तर प्रदेश, बिहारसारख्या परराज्यांतून जिल्ह्यात बंदूक आणि देशी बनावटीच्या पिस्तुलांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांनी या तस्करावर कारवाई केली, त्याचे मूळ शोधण्यात त्यांना अपयश आले.

आणखी वाचा-बुलढाणा: दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण

अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यात टोळीयुद्ध, हाणामाऱ्या, हत्याकांड, जीवघेणे हल्ले, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजकीय आशीर्वादाने वाळू, कोळसा, गुटखा व अवैध दारू तस्करीचा व्यवसाय आणि त्याच्या सोबतील ऑनलाईन क्रिकेट सट्टा, व्हीडिओ गेम पार्लर, कोंबडबाजार, भंगार तथा इतर अवैध धंदे सुरू आहेत. वाळू तस्करी, कोळसा व दारू तस्करीचे रॅकेट नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांपर्यंत पसरलेले आहे. यातून येणाऱ्या बक्कळ पैशामुळे हे अवैध धंदेचालक गब्बर झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होऊन खुनाच्या घटना वाढू लागल्या आहेत.