नागपूर : भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू केले असून त्यामुळे भारतीय रेल्वे अधिक वेगवान होत आहे. देशात अनेक ठिकाणी अधिक वजनाचे रुळ टाकण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व महत्वाच्या रेल्वे मार्गावरील रुळांची क्षमता वाढण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यांची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यामध्ये अधिक वजनाचे रुळ, सिंग्नल यंत्रणा आणि पुलांचे मजबुतीकरण आदींचा समावेश आहे. रेल्वे गाड्यांची गती ११० वरून १६० किमी प्रति तास करण्यासाठी रुळ अधिक वजनाचे वापरण्यात येत आहे. त्यासाठी सध्याचे रुळ आणि त्या खालील स्लीपरला बदलण्यात येत आहेत. सध्या जे रुळ आहेत त्यांचे वजन ५२ किलो प्रतिमीटर आहे. त्याऐवजी आता ६० किलो प्रतिमीटर वजनाचे रुळ टाकण्यात येत आहेत. या रुळांची वजन सहन करण्याची क्षमता अधिक आहे. या अधिक वजनाच्या रुळाखालील गिट्टी निघाली किंवा दरी (गॅप)निर्माण झाली तरी ते रुळ वाकणार नाहीत. त्यामुळे रेल्वेगाडी अधिक वेगाने धावणार आहे. तसेच रेल्वेळांमधील निर्माण होणारी दरी नष्ट करण्यासाठी रुळांची लांबी देखील वाढवण्यात येत आहे. ही लांबी ६५ मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मोसमी पाऊस अकोला, पुसद येथे पोहोचला! उर्वरित विदर्भात मात्र…

याशिवाय सिंग्नल यंत्रणेचेही अद्यावतीकरण करण्यात येत आहे. ‘डबल डिस्टेंट सिग्नल’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्व रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने धावतील आणि अपघात होण्याची शक्यता देखील कमी होईल. या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांना स्थानकाच्या बाहेर (आऊटरवर) देखील ताटकळत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

१३० किमी प्रतितास वेगाने चाचणी

इटारसी- नागपूर दरम्यान धारखोह-घोडाडोंगरी येथे ६० किलोचे रुळ बसवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढली आहे. या रेल्वे मार्गावरून १५० किलोमीटर गतीने देखील गाड्या धावू शकतील. काही ठिकाणी १३० किलोमीटर प्रतितासच्या वेगाने धावण्यासाठी चाचणी देखील झाली आहे. या उच्च क्षमता असलेल्या रुळांमुळे कंपण कमी होते. रुळांचे कंपण कमी होत असल्याने डबे रुळावरून घरण्यासाठी शक्यता कमी असते. रुळाचे वजन अधिक असल्याने रुळ एक-दुसऱ्याला जोडणारे सांधे देखील मजूबत राहणार आहेत.

हेही वाचा : देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?

१ किलोमीटर अंतरावर १२० अधिक स्लीपर

६० किलो प्रति मीटर वजनाचे रुळ बसवण्यात येत आहे. याशिवाय स्लीपरची देखील संख्या वावढण्यात येत आहे. दर एक किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर १६०० सिमेंट क्रॉक्रीटचे स्लीपर टाकण्यात येत आहे. पूर्वी १ किलोमीटर अंतरासाठी १५४० सिमेंट क्रॉक्रीटचे स्लीपर टाकण्यात येत होते. आता त्यापैकी १२० स्लीपर अधिक वापरण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight of railway tracks will be increased from 52 kg to 60 kg per meter to increase speed of railways rbt 74 css