अमरावती: यंदा डिसेंबरच्या मध्यावर पश्चिम विदर्भातील लहान-मोठ्या धरणांमध्ये २ हजार २७५ दशलक्ष घनमीटर अर्थात ७३.९८ टक्के जलसाठा शिल्लक असून गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी आहे.

यंदा काही भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. काही प्रकल्प मात्र तुडुंब भरले. सप्टेंबरअखेर विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये ८१.७१ टक्के जलसाठा झाला होता. मध्यंतरीच्या काळात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी वापरात असल्याने धरणातील पाणीसाठा हा हळूहळू कमी होत आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ४८२.८५ दलघमी म्हणजे ८५.६० टक्के पाणीसाठा असून अमरावतीकरांना पाणीटंचाईची भीती बाळगण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत अप्पर वर्धा धरणात ८५.९० टक्के पाणीसाठा होता. यंदा सप्टेंबर अखेर अप्पर वर्धा पूर्ण क्षमतेने भरले होते.

nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम

हेही वाचा… बुलढाणा: चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, वाघजाळ गावात तिघांना मारहाण; लाखाचा ऐवज लुटला

अमरावती विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्पांची संकल्पित पाणीसाठा हा १३९९ दलघमी इतका असून सध्या १०१७ दलघमी अर्थात ७२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २७ मध्यम प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा ७७१ दलघमी आहे. सध्या ५८४ दलघमी म्हणजे ७५.८२ टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्ये यंदा मात्र समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही. सध्या २४६ लघु प्रकल्पांमध्ये ६७३ दलघमी म्हणजे ७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा संपेपर्यंत सिंचनासाठी यंदा जपून पाणी वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा… बदलीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, अधिकाऱ्याविरोधात गुन्‍हा दाखल

पर्जन्यमान कमी राहिल्याने धरणांमध्ये आधीच कमी जलसाठा असताना सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. अपुऱ्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. डिसेंबरच्या मध्यावर धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील प्रमुख शहरे ही पिण्याच्या पाण्यासाठी धरणांवरच विसंबून आहेत. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

Story img Loader