अकोला : खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येवरील रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवले जातात. संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्ये सरासरी होणाऱ्या मृत्यूंनाच मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. हा प्रकार अहोरात्र झटणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

अकोल्यात महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, नांदेड येथे गंभीर घटना घडली. त्याला कमी लेखले जाऊ शकत नाही. वास्तव समजून घेण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येतील रुग्ण सर्रास शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवले जातात. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कधीच नाकारले जात नाही. शासकीय रुग्णालयातील मृत्यूमधील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयातून आलेलेच असतात. ही परिस्थिती दिसून आली. आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज आहेच. मात्र, शासकीय रुग्णालयात अहोरात्र कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आरोप करणे अयोग्य आहे. काही कमतरता असल्यास ती दूर केली जाईल.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 

हेही वाचा – पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…

आरोग्य यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. एक जरी मृत्यू झाला तर तो काळजीचा आहे. मृत्यू आपण थांबवू शकत नाही. रुग्णाला योग्य उपचार व औषध मिळाले की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. ३० टक्के औषधांची खरेदी स्थानिक पातळीवरून केली जाते. प्रामुख्याने लागणारे औषधे सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. आगामी काळात अग्रीम स्वरुपात औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र काही लोक राजकीय स्वार्थासाठी तयार करीत आहेत. शासकीय डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचे काम त्यांनी करू नये, असेदेखील फडणवीस यांनी नमूद केले.

Story img Loader