वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली आहे. योजनेच्या माध्यमातून देशातील ३० लाख कारागिरांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.

सुतार, लोहार, नाभिक, चर्मकार, सूर्वणकार, कुंभार, गवंडी, शिंपी, धोबी अश्या देशभरातील १४० जाती समूहांना योजनेचा लाभ मिळेल. या कार्यक्रमात कारागिरांना आवश्यक ते प्रशिक्षण तसेच निधी नसलेल्यांना सरकारी आर्थिक सहाय्य मिळेल. ग्रामीण कारागिरांना एक लाख रुपयांचे स्वस्त दरात कर्ज मिळणार. पहिल्या एक लाख रुपयांचा परतफेड कालावधी १८ महिन्यांचा तर दुसऱ्या दोन लाख रुपयांचा परतफेड कालावधी ३० महिन्यांचा असेल.

loksatta analysis indian government new draft guidelines on passive euthanasia
विश्लेषण : इच्छामरणासाठी भारत सरकारकडून मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार… काय आहेत प्रस्तावित तरतुदी?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Viral My Lords A Social Media Panchnama of Court Behaviour
व्हायरल माय लॉर्डस : न्यायालयातील वर्तनाचा समाजमाध्यमी पंचनामा
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन

हेही वाचा – अकोला : कारमध्ये कोंबून गायींची तस्करी; नाकाबंदीदरम्यान उघडकीस आला धक्कादायक प्रकार

कौशल्य मूलभूत प्रशिक्षण ४० तासांचे तर दुसरे प्रगत प्रशिक्षण १२० तासांचे मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत रोज ५०० रुपयांचे मानधन मिळणार. योजनेसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही कारागिरांना सुवर्णभेट असल्याचे खासदार रामदास तडस म्हणाले. योजनेच्या प्रक्षेपण सोहळ्यात ते बोलत होते.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात ३०२ ‘एक गाव, एक गणपती’; १७३२ मंडळांमध्ये गणपतीची स्थापना

यावेळी आ. डॉ. पंकज भाेयर, दादाराव केचे, समीर कुणावार, उपेंद्र कोठेकर, राजेश बकाने, सुनील गफाट, सुधीर दिवे, वैशाली येरावार व अन्य सहभागी झाले होते. लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, अधिवास व जात प्रमाणपत्र, बँक खाते, पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.