नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट भाजपच्या माध्यमातून शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला.दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत झाले. अजित पवारांचे भाषण आक्रमक होते तर शरद पवार यांनी सयंमीपणे भूमिका मांडली. शरद पवार यांच्या भाषणात आलेला स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाचा उल्लेख होता.

भाषणाचा शेवट त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ‘ उष:काल होता होता काळरात्र झाली,अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ‘ या कवितेच्या ओळीने केला. सुरेश भट हे सुद्धा वैदर्भीय कवी. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत उलथापालथीच्या काळात पवार यांना झालेली विदर्भाची आठवण व त्याचे राजकीय संदर्भ याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.पवार यांच्या भाषणातील स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीचा उल्लेख हा भाजप आणि विशेषतः या पक्षाचे नेते देवेश फडणवीस यांना टोला हाणणारा तसेच भाजप नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नसतो हे सांगणारा होता.यासाठी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीच्या आंदोलनांचे उदाहरण दिले. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Four former corporators from Ajit Pawars NCP warn that Mahavikas Aghadi option remains open
चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा भाजपचे…’ अजितदादांच्या माजी नगरसेवकांचा इशारा
sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

त्यानंतर केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असूनही विदर्भ राज्य झाले नाही आणि फडणवीस यांचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली. भाजपवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा देणा-यांची ही अवस्था होऊ शकते, हे पवार यांना सांगायचे होते. सुरेश भटांच्या कवितेचा उपयोग त्यांनी कार्यकर्त्यांना नव्या लढाईसाठी तयार रहा हे सांगण्यासाठी केला.