लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, पक्ष नेत्यांना सांभाळू शकत नसल्याने ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. राहुल गांधी पक्षातील नेत्यांना वेळ देत नाही. त्यामुळे काँग्रेस आता देश आणि राज्यस्तरावर कमकुवत झाला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली.

lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Swayamsevak will be personal secretaries of ministers
भाजप, संघ स्वयंसेवक मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून गेल्या काही दिवसात अनेक नेते पक्षातून बाहेर पडले आहे. अशोक चव्हाण, संजय निरुपम, अर्चना पाटील चाकुरकर, बसवराज पाटील ,उल्हास पाटील या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. काँग्रेसमधून असलेले अनेक नेते सांगतात. राहुल गांधी यांना वेळ नाही , ते भेटत नाही. आम्हाला कोणी विचारत नाही. मुळात राहुल गांधी यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष अजुन कमकुवत झालेला दिसेल. शिवाय जशी जशी मोदी यांची त्सुनामी महाराष्ट्रात येईल तसे आणखी मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील.

आणखी वाचा-नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’

संजय निरुपमशी चर्चा झाली नाही

मोदीच्या विकसित भारताला साथ देणारा आणि भाजप विचारावर काम करण्याची तयारी असेल अशा सर्वासाठी आमचा दुपट्टा तयार आहे. संजय निरुपम यांनी भाजपमध्ये येण्यासंबंधी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आमची काही त्यांच्यासोबत चर्चा नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

उमेदवार बदलाशी संबंध नाही

हिंगोलीचा शिवसेनेचा उमेदवार बदलला. त्याचे अधिकार एकनाथ शिंदेना आहे. अजित पवारांना यांचे उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे. याच्याशी भाजपचा संबध नाही भाजपाच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्याचे आम्ही सर्वेक्षण केले. शिवसेनेच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचा आमचा काहीच संबंध नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader