नागपूर – नागपूर हे शहर सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी पूर्वी ते मध्यप्रांताच्या राजधानीचे शहर होते. त्याच काळात येथे सुरू झालेले बसस्थानक आता आंतरराज्यीय बसस्थानक म्हणून ओळखले जाते. येथून मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसेस सुटतात. सध्या या बसस्थानकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टेकडी उड्डाण पुलाचे पाडकाम सुरू असल्याने या मार्गावर असलेल्या मध्यप्रदेश बसस्थानकावर जाण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे काही कालावधीसाठी हे बसस्थानक इतरत्र हलवण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Ten new ST buses at Barshi depot Solapur
बार्शी आगारात दहा नवीन एसटी बस; आजी-माजी आमदारांत श्रेयाची लढाई
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Reliance launched the Teerth Yatri Seva initiative at Maha Kumbh
महाकुंभात भाविकांसाठी रिलायन्सची ‘तीर्थयात्री सेवा’
Accident involving private bus and container at Alephata on Pune Nashik National Highway pune news
खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक: सात जण गंभीर जखमी; पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा येथील घटना
School bus fares increase by 18 percent
School Bus Fare Hike : ‘स्कूल बस’ची राज्यभर १८ टक्के भाडेवाढ
Maharashtra transport minister Pratap Sarnaik transport initiatives for msrtc land development
एसटीला भूमिहीन करू नका!
School Bus
School Bus Fare : पालकांसाठी महत्त्वाची बातमी; शाळा बस शुल्क ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; संघटनेने सरकारसमोर ठेवली ‘ही’ एकच अट!
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?

हेही वाचा – शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे ‘दरपत्रक’; बदल्या, शाळा मान्यता, निवृत्ती वेतनासाठी लाखोंची लाचखोरी

मानस चौक ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टेकडी उड्डाण पुलाचे पाडकाम सध्या सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेश बसस्थानकावर जाताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. या बसस्थानकावरून दररोज अनेक बसेस मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी सुटतात. हजारो प्रवाशांचे रोज येथून अवागमन होते. मात्र सध्याच्या स्थितीत त्यांची अडचण होत आहे.

हेही वाचा – वर्धा: टोमॅटोची उधारी मागितली म्हणून चाकूने भोसकले

पुलाच्या तोडकामामुळे रस्ता अरुंद झाला असून मलबाही रस्त्यालगत टाकला जात आहे. दरम्यान रेल्वे स्थानकापासून ऑटोरिक्षाच्या रांगा मध्यप्रदेश बसस्थानकापर्यंत येऊ लागल्या असून प्रवाशी घेण्यासाठी ऑटोचालकांची दिवसभर येथे धावपळ सुरू असते. याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे हे स्थानक इतरत्र हलवा अशी मागणी होत आहे.

Story img Loader