नागपूर : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात झालेल्या अवकाळी  पावसामुळे तेथून येणाऱ्या आंब्याची अवाक कमी झाल्याने तसेच विदर्भातही अवकाळी पावसाचा आंब्याला फटका बसल्याने या सर्व ठिकाणाहून कमी प्रमाणात आंबे बाजारात येत आहे. त्यामुळे  आंब्याच्या किंमती वाढल्या आहेत. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता.  अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांतून आंबा नागपुरात येतो. मात्र  अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने आवक कमी झाली. या शिवाय उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून आंबा नागपुरात येतो. कोकणातून आंबा नागपुरात येतो.

navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
pair of Coriander Rs 60 to Rs 80 in pune retail market
पुणे : कोथिंबिरीला उच्चांकी भाव, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दर
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Wardha, state government schemes,ladki bahin yojana, utensil distribution, construction workers, political pressure, Hinganghat taluka, Deoli taluka, Sena Thackeray group, chaos, administration,
वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
Due to encroachments on the drains water accumulates and creates a flood like situation Pune news
पिंपरी: नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहर तुंबले? अतिक्रमणावर लवकरच हातोडा
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

हेही वाचा >>>खुल्‍या जागेवरून झालेल्‍या वादात आई-मुलाची हत्‍या, वडील जखमी

 तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मात्र  एकूणच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने बाजारात आंब्यांची किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे.. नागपूरच्या  कळमना बाजारात फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दक्षिणेतून आलेल्या आंब्याचा दर ४० रुपये किलो होता. यावेळेसदर ६० ते ७० रुपये किलोवर गेला आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. गरजेपोटी तो व्यापाऱ्यांना कमी दरात आंबा विकतो. व्यापाऱ्यांकडे तोसाठवणूक करण्याची सोय असल्याने ते टप्प्या टप्प्याने बाजारात आणतात.