नागपूर : तमिळनाडूचे मंत्री स्टॅलिन सनातन धर्मावर टीका करीत असतना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनपर्यंत त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. विरोधकांनी या मुद्यावर मौन सोडले पाहिजे, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढले; अकोला परिमंडळात ३६४ आकडेबहाद्दरांवर कारवाई
ठाकरे स्वत:ला हिदुत्ववादी समजतात त्यांचे या विषयावर मौन का ? काही लोकांना भीती आणि गोंधळ पसरवण्याची, खोटे बोलण्याची सवय असते. सत्तालालसेपोटी उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या विचारसरणीलाही विसरले आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय विचार केला असता, असे ठाकूर म्हणाले.
First published on: 11-09-2023 at 13:21 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why uddhav rahul silent anurag thakur question in nagpur vmb 67 ssb