लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण सुरू झाली असून तो १४-१५ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरला आहे. मात्र, अजूनही तो आताच्या किमान तापमानापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे रविवारपासून राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Yarn mills in the state are on the verge of closure
राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!
Reduction in sugar production by one million tons will be possible pune print news
साखर उत्पादनात दहा लाख टनांनी घट शक्य होणार ? जाणून घ्या, कारणे आणि राज्यातील संभाव्य साखर उत्पादन
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे
rain given relief in some part of state elctricity demond increased
नागपूर : पावसाचा जोर कमी होताच राज्यात विजेची मागणी किती वाढली ?
Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं

शुक्रवारपासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात होईल व हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे. रविवार, १९ नोव्हेंबरपासून उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र २२ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानाचा पारा फार खाली उतरण्याची शक्यता नाही. मुंबई आणि महामुंबई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनक्षेत्राच्या परिसरामध्ये पहाटेच्या तापमानात काहीशी घट जाणवत आहे.

आणखी वाचा-नागपूर : मेडिकलच्या १७ माजी विद्यार्थ्यांना पद्मश्री-पद्मभूषण, तिघांना मॅगसेसे पुरस्कार

मात्र, त्या पलीकडे मुंबईला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात सध्या तरी मुंबईला दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वातावरण काहीसे ढगाळलेले असेल. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान कमी होऊ शकते. मात्र यामुळे पावसाची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले. राज्यात केवळ कोकण विभागात सध्या किमान तापमानाचा पारा २० अंशांपलीकडे नोंदला जात आहे. उर्वरित राज्यात पहाटेचे वातावरण सुखद आहे.