गडचिरोली: शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. महानंदा दिनेश मोहूर्ले (५३, रा.फरी) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ला करणारी वाघीण टी १४ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.

मृत महिला सकाळी ९ वाजताच्या सुमारास फरी-झरी जंगल परिसराला लागून असलेल्या आपल्या शेतात गवत काढायला गेलेली होती. दरम्यान, झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करून जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. यावेळी जवळपास असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता वाघ जंगलात पळून गेला. मात्र, तोपर्यंत महानंदा मोहुर्ले यांचा मृत्यू झाला होता.

Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत

हेही वाचा… अमरावतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतली रेल्वेसमोर उडी; वडिलांची राजापेठ ठाण्यात तक्रार

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. पिडीत कुटुंबाला तत्काळ नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी कळविले आहे. हा हल्ला टी १४ वाघिणीने केला असल्याची शक्यता देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी वर्तविली आहे. मधल्या काळात वाघांचे हल्ले कमी झाले होते. परंतु या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Story img Loader