अमरावती : एकीकडे शेतकऱ्यांच्‍या घरात हरभरा पडून असताना दुसरीकडे ‘नाफेड’ हरभरा खरेदी बंद करण्‍याचे आदेश देते. त्‍यामुळे या ‘ईडी’ सरकारचे हे चाललंय काय? असा सवाल करीत कॉंग्रेसच्‍या आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र आंदोलन छेडण्‍याचा इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथील खरेदी विक्री संघाला भेट दिली, त्‍यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

‘नाफेड’च्‍या वतीने हरभरा खरेदी सुरू झाली, तेव्‍हा शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी प्रचंड गर्दी केली होती. यशोमती ठाकूर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. हरभरा खरेदीचे काम सुरू असतानाच ‘नाफेड’च्‍या कार्यकारी संचालकांनी हरभरा खरेदी बंद केल्‍याचा आदेश नुकताच तिवसा येथील खरेदी विक्री संघाला प्राप्‍त झाला. या पार्श्‍वभूमिवर यशोमती ठाकूर यांनी खरेदी विक्री संघात पोहोचून भ्रमणध्‍वनीवरून वरिष्‍ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Aaditi Tatkare on Majhi Ladki Bahin Yojana Latest Update
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना; आता ‘त्या’ बँकांवर कारवाई होणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : माशेलकर समितीच्या शिफारशी स्वीकारा
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…तर खात्यात होणार नाहीत कोणतेच शासकीय व्यवहार”, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं!
narhari zirwal on son gokul zirwal
“सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे”, नरहरी झिरवाळांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर!
Hafkin Corporation has not benefited from ashwasit pragati yojana even after rahul narvekar promise
‘आश्वासित प्रगती’चे आश्वासनच? राहुल नार्वेकर यांना हाफकिनचा विसर पडल्याची कामगारांची खंत
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा

हेही वाचा – चंद्रपूर : ‘अदानी-मोदी विरोधात बोलल्यामुळे केजरीवाल यांची चौकशी’, सरकारच्या दडपशाही विरोधात ‘आप’चा सत्याग्रह

अनेक शेतकऱ्यांच्‍या घरी अजूनही हरभरा पडून आहे. ‘नाफेड’ने हरभरा खरेदी बंद केली, तर त्‍याची विक्री कुठे करायची, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्‍याय असून सरकार इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारजवळ पैसा नाही. हरभरा खरेदी बंद करण्‍याचे मौखिक आदेश देऊन सरकारने हात वर केले आहेत. हा कुठला न्‍याय आहे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा असून ‘नाफेड’ने हरभरा खरेदी केली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.