अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी तिवसा येथील दहीहंडीच्‍या कार्यक्रमात आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर पैसे घेतल्‍याचे आरोप केल्‍यानंतर त्‍याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. नवनीत राणा यांच्‍या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्‍याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा >>> अमरावतीत दहीहंडीचा खेळ की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा ?

Nilesh Lanke
इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकीत माझ्यावर…”
Uddhav Thackeray statement that he won in the people court now expect from the goddess of justice
जनतेच्या न्यायालयात जिंकलो, आता न्यायदेवतेकडून अपेक्षा; वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
ravi rana bachchu kadu latest marathi news
पराभवानंतर रवी राणा, बच्‍चू कडूंमधील वाद चव्‍हाट्यावर
Devesh Chandra Thakur nitish kumar
“यादव आणि मुसलमानांचं एकही काम करणार नाही, त्यांनी मला…”, नितीश कुमारांच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Prataprao Chikhalikar
‘पक्षाबरोबर गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही’, प्रताप पाटील चिखलीकरांचा इशारा; म्हणाले, “पात्रता नसणाऱ्यांना…”
sunetra pawar for rajyasabha demand
“सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा”; नेमकी कुणी केली मागणी? वाचा…
Vishwajit Kadam, Jayant Patil,
विश्वजित कदमांची जयंत पाटील यांच्यावर मात ?
Vishwajit Kadam, Jayant Patil,
विश्वजित कदमांची जयंत पाटील यांच्यावर मात ?

यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक खर्चात दिली का? एवढा मोठा दावा केला जातो, तर निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? निवडणूक आयोगाने राणांवर कारवाई का केली नाही? जर नवनीत राणा एवढा मोठा दावा करत आहेत, तर ईडी, सीबीआय काय करीत आहे?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, राणा दाम्‍पत्‍याने जिल्‍हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांचे जिल्ह्यात कुणाशीही पटत नाही. यापूर्वी त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर देखील आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आरोप मागे घेतले. बळवंत पाटील, प्रवीण पोटे यांच्‍यावरही त्‍यांनी खालच्‍या भाषेत टीका केली आहे.