यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुढचा नंबर आमचा तर नाही ना? अशी विचारणाच केली आहे.

तीन राज्यांना जोडणारा यवतमाळ अमरावती महामार्ग सध्या मृत्यूमार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावर असणाऱ्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.

Crime News
Crime News : ‘टॉयलेट सीट चाटायला भाग पाडलं…’, १५ वर्षीय विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; आईचा न्यायासाठी आक्रोश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Gondia, School van accident, School van ,
गोंदिया : स्कुलव्हॅनला अपघात, १३ विद्यार्थी जखमी
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
Dangerous transportation of students by vehicle continues in Vasai Possibility of accident
वसईत विद्यार्थ्यांची वाहनातून धोकादायक वाहतूक सुरूच; अपघाताची शक्यता
Students brave rope trolleys to reach school in Uttarakhand; viral video sparks outrage
खाली खळखळ वाहणारी नदी, एक दोरखंड अन् ट्रॉलीच्या भरोशावर….शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, Viral Video

उड्डानपुलावर कारची दुचाकीला जबर धडक; पुलाखाली कोसळून पत्नी ठार, पती गंभीर

उत्तर व दक्षिण कॉरिडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, उमरीपासून पांढरकवडा तालुक्यातील करंजी पर्यंतहा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. मात्र हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. या मार्गावर असणाऱ्या ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो. त्यांना जीव मुठीत घेऊन घरातून शाळेत जावे लागते. यामुळे अखेर दोन्ही जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकरनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यांवर दररोज प्रवास करताना होत असलेला त्रास आणि भीती याबद्दल व्यथा मांडली आहे.

याच महामार्गावर माझ्या दोन मैत्रिणींनी अपघातात जीव गमावला आहे. अनेक सामान्यांनाही जीव गमवावा लागला आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी मैथिली सांडे या नेर येथील विद्यार्थिनीने केली आहे.

Story img Loader