लोकसत्ता टीम

नागपूर : एका मित्राच्या घरी दारू पार्टी सुरु असताना एकाने “तुझ्या बहिणीशी माझे प्रेमप्रकरण सुरु असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले आहेत” असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या तीन तिघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरीतील पांढराबोडी परिसरत उघडकीस आली.

Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
boyfriend killed his girlfriend in pune
पुणे : प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार करुन खून,प्रियकराला अटक
Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद

सागर नकुल नागरे उर्फ (२७, सुदाम नगरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. आरोपी वीर विनोद थापा (१८, सुदामनगर) , अजित संतन नेताम (२६, सूदामनगर) आणि सुरेश मनोहर यादव (२५, अंबाझरी) अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-नागपुरात चिकनगुनियाचा उच्चांक, नागरिक त्रस्त; महापालिका म्हणते…

सागर नागले आणि आरोपी वीर, अजित आणि सुरेश हे सोमवारी रात्री १०:३० वाजता बंटी उइके या मित्राच्या घरात दारू पार्टी करीत बसले होते. पार्टी रंगात आल्यानंतर सागर नागले याने वीर थापाशी हुज्जत घातली. “तुझ्या मामे बहिणीशी माझे गेल्या एका वर्षापासून प्रेम संबंध आहेत, आही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते. तुझ्या बहिणीचे माझ्यावर प्रेम असून आम्ही लवकरच पळून जाऊन लग्न करणार आहोत” असे म्हणाला.

त्यामुळे वीर याला राग आला. त्याने सागरला समजावण्याचा प्रयत्न केल. मात्र तो समजत नव्हता. त्यामुळे रागाच्या भारत वीर आणि त्याच्या दोनही मित्रांनी सागरला मारहाण केली. त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. पण तो मानायला तयार नव्हता. त्यामुळे तिघांनीही सागरच्या डोक्यात दगड, गट्टू घालून खून केला. सागरला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपी पळून गेले. आरडाओरडा ऐकून शेजारी झोपेतून उठले. त्यांनी घरात जाऊन बघितले तर सागर हा मृतावस्थेत पडून दिसला. नागरिकांनी अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्‍या जिल्‍हा प्रमुखावर गोळीबार; कारची काच फुटली….

आरोपींना दोन तासात अटक

वीर, अजित आणि सुरेश हे तिघेही अंबाझरी तलावावर पळून गेले. तेथे त्यांनी पुन्हा दारू ढोसली. पोलिसांनी आरोपींचे लोकेशन काढून तिघांनाही अटक केली. आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे.